Wednesday, February 4, 2015

Kaydyane Waga Public Movement

कायद्याने वागा
लोकचळवळीत
सामील व्हा...!!!
१. प्रत्येक सामाजिक समस्येचे उत्तर राजकारणात आहे.
२. भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र असल्याने इथे भारतीय जनतेची सत्ता अपेक्षित आहे. पण सत्ता लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मर्जीने चालवायची असते व एकदा निवडणूक पार पडली की आपली जबाबदारी उरत नाही, असा काहीसा समज सर्वसामान्य जनतेने करून घेतलाय. त्याचा गैरफायदा लोकप्रतिनिधी घेतात. जनतेच्या विश्वासाला तडा देतात.
३. वर्षेनुवर्षे करोंडोंचा चुराडा होऊनही शहरे, गावे जिथल्यातिथेच आहेत.
४. विकासाला स्वार्थाची लागण झाली आहे. निवडणुक प्रक्रिया भ्रष्ट झाली आहे. जनतेला जे जे आवडतं, ते ते करणारे लोकप्रतिनिधी लोकप्रिय आहेत.
५. ढोबळ विकासाचा पुरस्कार करणाऱ्यांत स्पर्धा असते आणि तसेच लोक निवडून येतात.
६. त्यांच्या संकल्पनेतील विकासाचा पाया वाटमारीवर अवलंबून असल्याने, तिथे नियोजनाचा अभाव आहे, पर्यावरणाचा समतोल नाही, भविष्याची तरतूद नाही, वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक पाया नाही, बदलत्या काळाचं भान नाही.
७. राजकारण हा अल्पावधीत पैसा, प्रतिष्ठा कमावण्याचा लघुमार्ग बनल्याने ते आता गुंतवणुकीचं क्षेत्र झालं आहे. निवडणुका त्यामुळेच महाग झाल्या आहेत.
८. यावर उपाय एकच. राजकारण जर बहुमतावर चालत असेल, तर बहुमताची आवड बदलावी लागेल. बहुमताचा दृष्टीकोन बदलावा लागेल. प्रशासकीय, राजकीय, सामाजिक व्यवस्था बहुमताला समजावून सांगावी लागेल. थोडक्यात चांगल्या सकारात्मक विचारांचं बहुमत तयार करावं लागेल.
९. काम कठीण आहे. पण अशक्य नाही. बदल ही एक प्रक्रिया आहे. ज्यांना बदल हवाय, त्यांना बदलाच्या प्रक्रियेतूनच जावंच लागेल. त्यासाठी धीर हवा, चिकाटी हवी. मुळात विचारांची प्रामाणिकता हवी. कायद्याने वागा लोकचळवळीला अशा लोकांची प्रतिक्षा आहे.
१०. विद्यमान नियमकायद्यांच्या अंमलबजावणीचा आग्रह, काही कायद्यांत काळानुरूप सुधारणा, आवश्यकतेनुसार नव्या कायद्यांची मागणी आणि समांतर पातळीवर लोकशिक्षण ही आपली कार्यपध्दती आहे
आपला प्रतिसाद सकारात्मक असेल, सोबत काम करायची इच्छा असेल, तर आपल्या नाव, पत्ता, वय, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभुमी या माहितीसहित कळवा.
kaydyanewaga@gmail.com.
raj.asrondkar@gmail.com

वॉटस्एपवर कायद्याने वागा लोकचळवळीचे सद्या अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, ठाणे-मुंबई, नवी मुंबई, पूणे, जळगांव, बुलढाणा, चंद्रपुर असे स्वतंत्र समुह आहेत. आणखीही जिल्हावार समुह बनविण्यात येणार आहेत. संख्या वाढली तर तालुका- शहर पातळीवर समुह बनविण्यात येतील. आपल्या जिल्ह्यातही समुह बनवायचे असतील तर मला ९८५००४४२०१ या क्रमांकावर नाव-पत्त्यासहित वॉटस्एप संदेश पाठवा. फक्त एकच लक्षात ठेवा. हे फावला वेळ घालविण्यासाठीचे समुह नसून, सामाजिक विषयांवर विचारांची देवाणघेवाण करून परिणामकारक लोकचळवळ उभी करण्याचं माध्यम आहे.

राज असरोंडकर
संस्थापक अध्यक्ष, कायद्याने वागा लोकचळवळ.